Showing posts with label bajiprabhu dehpande. Show all posts
Showing posts with label bajiprabhu dehpande. Show all posts

Tuesday, 4 April 2017

तीर्थरूप कैलासवासी थोरले महाराजसाहेब....!!!!!!





आज राजांना दुनिया सलाम करते यात दुमत नाही मोठमोठ्या इतिहासकार व्याकींनी राजांविषयी अनेक गौरवपर उद्गार काढले आहेत हे सर्वांस ठाव आहेत पण राजांच्या समकालीन माणसांनी त्यांच्याविषयी काढलेले उद्गार आज आपल्या वाचकांसाठी

"हे मऱ्हाष्ट्र राज्य आहे.अवघीयांनी हिम्मत धरून जम्माव घेऊन राजश्री-स्वामी सानिध्ह राहोन येकनिष्टेने शेवा करावी " - कान्होजी जेधे

"तीर्थरूप कैलासवासी थोरले महाराजसाहेबांनी जैसे निर्माण केले तैसेची राज्य चालवावे " - छत्रपती संभाजी महाराज

"स्वामींची कीर्ती दिगंती होऊन दिवसेदिवस येशाची अभिवृत्ती होत आहे" - येसाजी रघुनाथ

"रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग,रणी निघता शूर न पाहे माघारे"- तुकाराम महाराज

"उदंड राजकारण तटले,तेणे चित्र विभागले | प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे || "- रामदास स्वामी

"एकची मागणे आता, द्यावे ते मजकारणे | तुझा तू वाढवी राजा,सीघ्र आम्हाची देखता || " - तुळजाभवानीस साकडे

"हे राज्य तरी तीर्थरूप कैलासवासी स्वामींनी गडावरूनच तयार केले "- छत्रपती राजाराम

"सर्वांचा मान राखणारा सर्वांचा लाडका प्रामाणिक आणि प्रजाहितदक्ष राजा " - कॉस्मे द गार्डा

"शिवाजी एक चांगला मित्र, सज्जन विरोधक आणि राजकारणकुशल राजा होता " - सुरतमधील व्यापारी

"The great rebel and mightiest enemy of Mughal Empire" - इंग्रज

Saturday, 27 August 2016

Bajiprabhu Deshpande


सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते.बाजीप्रभू हे बांदल यांचे सरदार होते.रायाजी बांदल[१],फुलाजी प्रभू आणि सुमारे ६०० बांदल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते[२]. त्या वेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापुरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात आहे. सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. (ही घटना दिनांक १३ जुलै, १६६० रोजी घडल्याची इतिहासात नोंद आहे.) मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले.